दिशाहीन वाऱ्याची सोबत मागू पाहतो ,
अनोळखी वाटेवरून आता चालू पाहतो....
गर्दीत ह्या व्याकुळ झाला जीव ,
आपलीच माणसं न करू लागली किंव ...
अस्थिर झालेलं मन , एकांत मागू लागल ,
वर्दळ असलेलं हे जग सोडून जावंस वाटलं ...
अनोळखी वाटेवर घर नव बांधावस वाटतं ,
ओळखीच्या पाखरालाही तिथे अलाउड नसावं असं वाटतं ....
एक क्षण स्वतः साठी जगावंस वाटतं ,
हे जीवन विसरून जिवंत पणीच , स्वर्ग सुख ,
अनुभवावंस वाटतं .....
स्वतःच्या विश्वात हरवून जावंस वाटतं ,
अनोळखी ह्या वाटेवरून चालावस वाटतं ,
वर्दळ असलेलं आयुष्य विसरून जावंस वाटतं ....
दुर्गा मते
©®
अतिशय सुंदर रचना केली नित्या👌👌👌
ReplyDelete