आज माझ भांडण फक्त तुझ्याशी आहे देवा ..
तू गुन्हेगार आहेस माझा .
खूप मोठा गुन्हेगार ..
काय हवं होतं मला .
जे मनात होतं तेच तर नशिबात हवं होतं .
आणि जे नशिबात आहे .
त्याच्यापेक्षा जे मनात होतं .
ते खूप बेस्ट होतं हे तुला मान्य करावं लागेल ..
रोज भीक मागायचे रे तुझ्यासमोर का भीक नाही घातली पदरात . एवढी गरिबी पसरलेली आहे का रे ? तुझ्या घरी की तू भीक नाही घालू. शकत तुझ्या भक्ताला ..
सहन करते म्हणून सहन करायला लावणारं का ? गप्प बसत राहिले म्हणून गप्प राहायला शिकवलं . हट्ट करायचं कधी जमलच नाही . जे आहे तसं मी स्वीकारलं . अगदी मनाविरुध्द ज्या गोष्टी करायला नाही . पाहिजे त्या ही गोष्टी केल्या . ह्यासाठी का मी जन्म घेतला होता देवा ? ह्यासाठी का मी स्वप्न पाहिली होती काही ?
देवा सांग रे ?
तू नेहमी गप्प राहते मी नेहमी बोलते . देवा तू जे सती युगात लिहून ठेवलं आहे ना . ते कलियुगात मॅच तर होतं.
पण सुट नाही होतं रे .
माणूस जगतो . त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याच्या ईश्चा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि तू त्याचं अर्ध्यावर सोडतो . मानवाला निराश करतोस . असं का रे देवा ?
असं नको करू देवा .
मानवाची स्वप्न अर्ध्यावर सोडू नकोस . ते पूर्ण करण्याचं बळ त्याला दे . जेणेकरून तो नव्याने आयुष्याची सुरुवात झाली .
ज्या मुला मुलींच एकमेकांवर प्रेम आहे . त्यांना कधीच वेगळं करू नकोस . कारण त्यांना एकमेकांना पासून वेगळ करन म्हणजे जिवंत पणीच नरक यातना भोगायला पाठवण्यासारख आहे रे .
असं म्हणतात जे नशिबात असतं ..तेचं घडत मग देवा जे नशिबात असतं तेच तू का मनात नाही येऊ देत. का नशिबाचे आणि मनाचे सुर नाही जुळू देत .
देवा मला टीका नाही करायची रे तुझ्यावर . फक्त प्रामाणिक पने विनंती करायची आहे .
जी मुलं एकमेकांवर जीवापाड प्रेम करतात . त्यांना कधीही वेगळ करू नकोस . जे प्रयत्न करतात . त्यांना अपयश देऊ नकोस .
माणूस हा आशावादी प्राणी आहे रे ..त्याला कधीही निराश करू नकोस.
दुर्गा मते ..
तुला माझ्या बोलण्याच वाईट वाटलं असेल तर मनापासून माफी मागते . माफ कर मला . आणि माझ्या भावनांचा जरा विचार कर ..
🙏🙏🙏🙏
No comments:
Post a Comment
Comments plz.